Wednesday, February 8, 2017


स्मरण मुक्ताचे !
आज मुंबई मिरर मध्ये युनिस डिसोझा ह्यांनी नझिम हिकमत ह्यांच्या तुरुंगाच्या भिंतीवरच्या कवितात एक कविता उद्धृत केली आहे. ती अशी :
“Today is Sunday. For the first time they took me out in the sun today.
And for the first time in my life I was aghast That the sky is so far away And so blue And so vast.
I stood there without a motion.
Then I sat on the ground with respectful devotion Leaning against the white wall.
Who cares about the waves with which I yearn to roll Or about strife or my wife right now The soil, the sun and me.
I feel joyful and how.“
तुरुंगातल्या एका कवीला सूर्याच्या मुक्ततेचे स्मरण व्हावे व ह्या ओळी वाचून तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहिणाऱ्या सावरकरांची आठवण झाली व त्या शोधताना मला अंदमानच्या संकेतस्थळावर सावरकरांचे एक चित्र दिसले ज्यात भिंतीवरच्या काही ओळी दिसल्या. त्या शोधल्यावर अशा होत्या :
:
कमला काव्य
आणि हे सोनचाफ्या, तू शिकलासि तरी कुठे
ही दिव्य किमया ? आम्हा स्वयमन्य नरां जिथे
रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते
ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळुनी तिथे
मृदूचेतन सोन्याची, स्वर्णचंपक ! ही फुले
सुगंधी तुज पाहुनी निर्मितां मन हे भुले
प्रियाच सोनचाप्याची, चमेली किती ही खुले
तो तिच्यावरी, ती त्याच्यावरती उधळी फुले !
काय गंमत, हे कमला काव्य मला इंटरनेट वर मिळाले व ते ज्यांनी ( कवी वा.गो. मायदेव ) संपादित केले त्यांचीही मला आठवण झाली. मी पुण्याला इंजिनीअरिंग हॉस्टेलला असताना दर रविवारी मायदेवांच्या घरी जात असे. हे आपल्या सौ. सुधाताई काळदाते ह्यांचे वडील होत. ते रविकिरण मंडळातले कवी असून जुन्या काळातले लहान मुलांच्या कविता लिहिणारे कवी होते व त्यांचे बोलणे अतिशय मृदू व प्रांजळ असे. अशा कवीने हे कमला काव्य संपादित करावे हा मोठा काव्यमय न्याय आहे. ह्या ओळीत तुम्हाला दिसेल की तुरुंगातल्या कवीला सोनचाफ्याचे स्मरण व्हावे हे अपार काव्यमय आहे.
असेच माझे वडील ( कै. अनंत भालेराव ) हे एकदा तीन महिन्याचा तुरुंगवास भोगून घरी आले तेव्हा सांगत होते की आम्ही तुरुंगातून बाहेर पडलो व आम्हाला शेतात एक गाय चारा खात असलेली दिसली व आम्हाला इतका आनंद झाला की काय स्वातंत्र्याचे मूर्तिमंत चित्र आहे, की खुल्या आभाळाखाली एक गाय मुक्तपणे चारा खात आहे !
मुक्ततेचे एव्हढे बोलके चित्र व भावना मी पहिल्यांदाच पहात होतो. माझ्या अत्याचेच नाव मुक्ता असल्याने ह्या निमित्ताने आज तिचीही आठवण झाली.
हेच स्मरण मुक्तांचे !
------------------------

Saturday, January 21, 2017

खाणे,एक लांछन !

खाणे, एक लांछ्न !
वि.वा. शिरवाडकरांचे एक सायन्स फिक्शन वाले पुस्तक मी खूप वर्षामागे वाचले होते. त्यात अन्न खाणे ही क्रिया त्या गृहावर अतिशय अनैतिक मानल्या गेली होती. आज जसे संभोग हा अति खाजगी प्रकार आहे तसेच त्या गृहावर खाणे हे अति खाजगी मानल्या जायचे. प्रत्येक जण जेवण्यासाठी अति गुप्त अशा ठिकाणी जायचा व मग गुपचूप खायचा !
आज मांसाहार केला तरी प्राण्यांचा आपण जीव घेतो आहोत हे काही टाळता येत नाही. आणि शाकाहार केला तरी वनस्पतीला काय जीव नसतो का हे नाकारता येत नाही. त्यामुळे काहीही खाताना एक प्रकारची अपराधी जाणीव येतेच.
जे मोठ मोठे साधू संत होऊन गेले त्यांचे जीवन पाहिले तर खाणे हा प्रकार त्यांच्यासाठी अतिशय खालच्या दर्जाचा होता हेच दिसेल. खाण्याचा अर्धा तास त्यांना मिळाला तर ते साधनेत नक्कीच वळता करतील, इतके खाणे त्यांना गौण !
म्हातारपणी आहार आपसूकच कमी होतो खरा, पण एकूणातच खाणे हे एक लांछनच म्हणावे लागेल !
------------------------------

Tuesday, January 17, 2017

स्त्रिया, आया, बाया...

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )
जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Monday, January 16, 2017

स्त्रिया, आया, बाया, ह्या खरेच अनेकवचनी आहेत ?
अनेकवचन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत ते संखेने एक आहेत की अनेक आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. व्याकरणात असा नियम आहे की ज्या ईकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन होते त्याचे रूपांतर याकारांत अक्षराने होते व उदाहरणे देतात : स्त्री-स्त्रिया, बी-बिया . नदी-नद्या, काठी-काठ्या, भाकरी-भाकर्या , लेखणी-लेखण्या, ( अपवाद आहेत : दासी, दृष्टी )

जोडपे , त्रिकूट , पंचक , आठवडा , डझन , शत , सहस्त्र , लक्ष , कोटी हे शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अनेकत्वाचे आहेत पण ते सगळे मिळून एकच गट आपण घेतो व त्याला एकवचनासारखेच   वापरतो. आता ह्याच वळणाने “आया” पहा. त्यात हिंदू आया, मुसलमान आया , ख्रिश्चन आया ह्या सगळ्याच “आया” मध्ये येतात. त्या अर्थाने त्या एकाच प्रकारच्या आया होत नाहीत. पण त्या सगळ्या आयांचे आईपण सारखेच नसते का ? त्या अर्थाने आया हा एक गटच होतो. अनेक वेगवेगळी फुले फुलविणारी झाडे व त्यांच्या बिया किती वेगवेगळ्या ! पण त्यांचे बित्व किती एकसारखे !  असेच नद्या , काठ्या लाठ्या, भाकर्या , वगैरे. वेश्या ह्या वेगवेगळे दर लावणाऱ्या पण मोलाने सुख विकणे हे सगळ्यांच्यात किती एकसारखे !  प्रत्येक वर्गाची फी कमी जास्त, पण “फिया” म्हणजे किती एकसारखा आकार लावण्याचा प्रकार ! जणू ह्या प्रकाराच्या होकारालाच आपण “या” म्हणतो आहोत !

Friday, January 13, 2017

तिळ गुळाची भाषा ! 
आज संक्रांतीचे आपण मराठी लोक आवर्जून म्हणतो की “तिळगुळ घ्या, गोड बोला ”. आणि तरीही आपण मराठी जाणल्या जातो ते आपल्या रोखठोक-पणाने, आपल्या रांगड्या भाषेने ! हे काय गूढ आहे ?
गोड बोलण्याचे आज आपण काय प्रतीक देतो आहोत ? तर तिळ व गुळ. तिळ पाहताच आपल्याला जाणवतो तो तिळाचा लहानपणा. ( एवढा एक लहान तिळ म्हणे पांडवांनी सात जणात वाटून खाल्ला होता, हे एक गूढच, हिंदी गूढ/गुळ नव्हे मराठी गूढ !.).म्हणजे हे छोटे प्रतीक जणू आपल्याला खुणावते आहे, मित-भाषी व्हा !
गुळात आयर्न, लोह, चांगल्या प्रमाणात असते म्हणे. म्हणजे गोड बोलणे हे लोखंडासारखे कडक झाले की ! कदाचित त्यामुळेच गुळासारखे गोड असूनही मराठी माणसांचे बोलणे गुळातल्या लोहासारखे कडक, रोखठोक होते ! शिवाय त्यातला गोड अर्थ गुल होण्यामागे व्युत्पत्तीशास्त्र कारणीभूत असावे. कारण गुळ हा शब्द संस्कृत गुल वरून आला आहे म्हणतात. ( अर्थात संस्कृतात गुलचा अर्थ कच्ची साखर असाच आहे ). तेव्हा आपल्या गुळ ह्या प्रतीकातला गोडपणा गुल झाला तर तो दोष मराठी माणसांचा नसून व्युत्पत्तीचा आहे !
तेव्हा तिळगुळ घ्या व तरी गोड बोला ! 
---------------------------