Friday, January 13, 2017

तिळ गुळाची भाषा ! 
आज संक्रांतीचे आपण मराठी लोक आवर्जून म्हणतो की “तिळगुळ घ्या, गोड बोला ”. आणि तरीही आपण मराठी जाणल्या जातो ते आपल्या रोखठोक-पणाने, आपल्या रांगड्या भाषेने ! हे काय गूढ आहे ?
गोड बोलण्याचे आज आपण काय प्रतीक देतो आहोत ? तर तिळ व गुळ. तिळ पाहताच आपल्याला जाणवतो तो तिळाचा लहानपणा. ( एवढा एक लहान तिळ म्हणे पांडवांनी सात जणात वाटून खाल्ला होता, हे एक गूढच, हिंदी गूढ/गुळ नव्हे मराठी गूढ !.).म्हणजे हे छोटे प्रतीक जणू आपल्याला खुणावते आहे, मित-भाषी व्हा !
गुळात आयर्न, लोह, चांगल्या प्रमाणात असते म्हणे. म्हणजे गोड बोलणे हे लोखंडासारखे कडक झाले की ! कदाचित त्यामुळेच गुळासारखे गोड असूनही मराठी माणसांचे बोलणे गुळातल्या लोहासारखे कडक, रोखठोक होते ! शिवाय त्यातला गोड अर्थ गुल होण्यामागे व्युत्पत्तीशास्त्र कारणीभूत असावे. कारण गुळ हा शब्द संस्कृत गुल वरून आला आहे म्हणतात. ( अर्थात संस्कृतात गुलचा अर्थ कच्ची साखर असाच आहे ). तेव्हा आपल्या गुळ ह्या प्रतीकातला गोडपणा गुल झाला तर तो दोष मराठी माणसांचा नसून व्युत्पत्तीचा आहे !
तेव्हा तिळगुळ घ्या व तरी गोड बोला ! 
---------------------------

No comments:

Post a Comment